संदेश

महाराष्ट्रात कांद्याची दर कोसळण्याचे कारण

चित्र
  महाराष्ट्र टाइम्स   कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी कांद्याची आवक कमी असून देखील कांद्याच्या दरात प्रचंड घसरण झालेली पहायला मिळाली मागील तीन महिन्यापूर्वी 40 रुपये प्रति किलो या दराने विकला जाणारा कांदा आता तब्बल 19 रुपये प्रतिकिलो आला आहे त्यामुळे अनेक दिवसांपासून उंच भरारी घेतलेला कांदा अत्यंत वेगाने कोसळत आहे मात्र हा कोसळणार दर शेतकऱ्यांच्या काळजाचे पाणी करत असून आता पुढे काय करायचे ? असा मोठा प्रश्न शेतकर्‍यांपुढे उभा राहिला आहे . मागील एक महिन्यांपासून कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याची कमी-अधिक स्वरूपात आवक असल्याने कांद्याच्या दरात किरकोळ चढ-उतार सुरू होता व दर 30 ते 40 रुपयांच्या दरम्यान स्थिरावलेले असायचे मात्र गुरुवारी आवक कमी झाली असून कांद्याचे दर वाढलेच नाही महाराष्ट्रातील कांदा गुजरात , तमिळ, कर्नाटक, राजस्थान इत्यादी राज्यात निर्यात केला जातो मात्र सध्या या भागातील स्थानिक कांदा बाजारपेठ आल्याने आपल्या  कांद्याचा उठाव कमी झाला आहे परिणाम महाराष्ट्रातील कांद्याला मागणी कमी झाल्याने व्यापारी वर्ग कांदा खरेदी करत नाही त्यामुळे बाजारात कांद्याची आवक कमी ...

फास्टॅगद्वारे महागड्या टोलपासून बचावासाठी काढला असा जुगाड की अधिकारीही झाले हैराण...

चित्र
  Kay highlights • सरकारने देशभरात १५ फेब्रुवारीपासून फास्टॅग गरजेचा केला आहे.  • जर तुमच्या गाडीवर फास्टॅग नसेल तर तुम्हाला टोल प्लाझावर डबल टॅक्स अथवा दंड भरावा लागेल • लोकांनी महागड्या टोलपासून सुटका मिळवण्यासाठी जुगाड शोधून काढला आहे ___________________________________________ महाराष्ट्र टाइम्स : लोकांना टोलबूथवरील(tollbooth) लांबच लांब रांगापासून सुटका मिळावी तसेच त्यांचा त्रास कमी करण्यासाठी सरकारने संपूर्ण देशभरात १५ फेब्रुवारीपासून फास्टॅग(fastag) गरजेचे केले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आणि दुप्पट टोल भरावा लागतो. सरकारला आशा आहे की यामुळे लोकांचा रांगामधील त्रास कमी होईल तसेच रेव्हेन्यूमध्येही फायदा होईल. मात्र काही जुगाड करणाऱ्यांनी यातूनही पळून जाण्याचा मार्ग शोधून काढला आहे. यामुळे सरकारला लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते.  💁तपासादरम्यान समोर आली बाब पत्रिकेच्या बातमीनुसार राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा याबाबत तपास केला तेव्हा ते हैराण झाले. तपासात समजले की टोल पार करणारी गाडी वेगळीच आहे आणि फास्टॅग कोणत्या वेगळ्याच गाडीचा आहे. दरम्...

स्वस्त होणार पेट्रोल आणि डिझेल:अर्थ मंत्रालयाने कमी केला टॅक्स, राज्यांसोबतही होत आहे चर्चा; 15 मार्चपर्यंत कमी होऊ शकतात किंमती

चित्र
  • काही शहरांमध्ये सध्या पेट्रोलच्या किंमती 100 च्या पार गेल्या आहेत • एप्रिल ते डिसेंबर 2020 दरम्यान सरकारला 4.21 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला पेट्रोल आणि डिझेल लवकरच स्वस्त होणार आहेत. या दोघांवरील एक्साइज ड्यूटी कमी करण्याच्या उद्देशाने अर्थ मंत्रालय विचार करत असल्याची बातमी आहे. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही 💁15 मार्च पर्यंत किंमती कमी होऊ शकतात 15 मार्चपर्यंत कर कमी करण्याचा निर्णय घेता येईल अशी बातमी आहे. सरकारी सुत्रांच्या म्हणण्यानुसार लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल. गेल्या 10 महिन्यांत कच्च्या तेलाची किंमत दुपटीने वाढली आहे. त्याचप्रमाणे देशातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत सध्या सरासरी 92 आणि 86 रुपयांच्या वर आहे. काही शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या पलीकडे आहे. अशा परिस्थितीत सगळीकडून दबाव वाढल्याने सरकार उत्पादन शुल्क कमी करू शकते 💁केंद्र सरकारने उत्पादन शुल्क लादले, राज्य सरकारने व्हॅट लावला केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क आकारते, तर राज्य सरकार व्हॅट आकारतात. गेल्या दोन ते तीन दिवसांत सरकारी अधिकार...

IPL 2021 : आयपीएल सुरू व्हायच्या आधीच मुंबईला बसणार सगळ्यात मोठा धक्का!

चित्र
 आयपीएल 2021 (IPL 2021) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. पण यंदाची स्पर्धा सुरू होण्याआधीच गतविजेत्या मुंबई इंडियन्सना (Mumbai Indians) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे . महाराष्ट्र टाइम्स  2 मार्च : आयपीएल 2021 (IPL 2021) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यंदाच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा अजून झाली नसली, तर एप्रिल महिन्यात स्पर्धेला सुरूवात होईल, असं सांगितलं जात आहे. पण यंदाची स्पर्धा सुरू होण्याआधीच गतविजेत्या मुंबई इंडियन्सना (Mumbai Indians) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातले कोरोनाचे (Maharashtra Corona) वाढते आकडे लक्षात घेता मुंबईत सामन्यांचं आयोजन होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. आयपीएलच्या नियमांनुसार यावर्षीचा ओपनिंग सामना आणि फायनल वानखेडे स्टेडियमवर खेळवणं अपेक्षित होतं. पण ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार बीसीसीआय (BCCI) महाराष्ट्राबाहेर स्पर्धेचं आयोजन करण्याचा विचार करत आहे. याबाबतचा अंतिम निर्णय अजून झालेला नाही. पण चेन्नई, बँगलोर, हैदराबाद, कोलकाता, अहमदाबाद आणि दिल्लीमध्य यावेळची स्पर्धा खेळली जाऊ शकते. बीसीसीआय...

लसीकरणासाठी खासगी रुग्णालयांकडून टाळाटाळ!

चित्र
  मनुष्यबळ, जागा, रुग्णालयांवरील कामाचा भार अशी कारणे सांगून अनेक रुग्णालये टाळाटाळ करत आहेत सरकारने साठ वर्षांवरील वृद्धांसह ४५ ते ५९ वयोगटातील गंभीर आजाराच्या व्यक्तींनाही १ मार्चपासून शासकीय लसीकरण केंद्रांवर नि: शुल्क तर खासगी रुग्णालयांत २५० रुपयांत करोना प्रतिबंधित लस देण्याची घोषणा केली. या मोहिमेत राज्यातील ६८३ खासगी रुग्णालयांतील केंद्रांचा समावेश असला तरी केवळ १२५ केंद्रातच लसीकरण सुरू झाले आहे. मनुष्यबळ, जागा, रुग्णालयांवरील कामाचा भार अशी कारणे सांगून अनेक रुग्णालये टाळाटाळ करत आहेत. लसीकरण केंद्रासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना व पंतप्रधान जन आरोग्य योजनेशी संलग्नित राज्यातील ६३८ रुग्णालयेच घेण्याचे आरोग्य विभागाने निश्चित केले आहे. त्यासाठी रुग्णालयांचे संमतीपत्र आवश्यक आहे. दरम्यान, राज्याच्या काही भागात पुन्हा करोनाचे संक्रमण बघता तातडीने आरोग्य कर्मचाऱ्यांना शासनाकडून लसीकरणाबाबत ऑनलाईन प्रशिक्षणही दिले गेले. परंतु रोज एका केंद्रात १०० जणांनाचेच लसीकरण होणार आहे यासाठी खासगी रुग्णालयांत विशेष कक्ष, प्रतीक्षागृह, लस दिल्यावर ३० मिनिटे बसवण्याची सोय, रुग्णाला क...

IND vs ENG : रोहितच्या जागी विराटचा फेवरेट । विराट वनडे सीरिज खेळणार!

चित्र
भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातली टेस्ट सीरिज संपल्यानंतर दोन्ही टीम 5 टी-20 आणि 3 वनडे मॅचची सीरिज खेळणार आहेत. वनडे सीरिजमधून रोहित शर्माला (Rohit Sharma) विश्रांती दिली जाऊ शकते, असं बोललं जात आहे. त्यामुळे रोहितऐवजी देवदत्त पडिक्कलला (Devdutt Padikkal) संधी मिळू शकते . महाराष्ट्रर टाइम्स मार्च : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातली टेस्ट सीरिज संपल्यानंतर दोन्ही टीम 5 टी-20 आणि 3 वनडे मॅचची सीरिज खेळणार आहेत. टी-20 सीरिजसाठी भारतीय टीमची निवड झाली आहे, तर वनडे सीरिजच्या टीमची अजून घोषणा व्हायची आहे. त्यामुळे वनडे सीरिजमधून रोहित शर्माला (Rohit Sharma) विश्रांती दिली जाऊ शकते, असं बोललं जात आहे. रोहित शर्मा कोरोना यायच्या आधीपासून क्रिकेट खेळत आहे. रोहित मागच्यावर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतातली वनडे सीरिज, त्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यात 5 टी-20 मॅच, सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आयपीएल खेळला. यानंतर दुखापतीमुळे तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वनडे आणि टी-20 सीरिज खेळला नाही. पण शेवटच्या दोन टेस्टसाठी तो मैदानात उतरला. आता तो इंग्लंडविरुद्ध 4 टेस्ट मॅचची सीरिज खेळत आह...

विराटची अनोखी सेन्चुरी, इन्स्टावर 100 मिलियन फॉलोअर्स, एवढे चाहते असणारा जगातील एकमेव क्रिकेटर

चित्र
  Maharashtra Times : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची लोकप्रियता जगभर आहे. आपल्या खेळण्याचा अंदाज, खेळातलं सातत्य यासह तो आपल्या स्टाईलमुळं नेहमी चर्चेत असतो. मैदानावर त्यानं आजवर अनेक रेकॉर्ड्स केले आहेत. मैदानातील विक्रमांसह आता त्यानं सोशल मीडियावर देखील एक नवा विक्रम केला आहे. विराट कोहलीचे इन्स्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्स झाले आहे. 100 मिलियन फॉलोअर्स असणारा विराट जगातील पहिला क्रिकेटर ठरला आहे. View this post on Instagram A post shared by ICC (@icc) विराट कोहलीच्या या यशाबद्दल इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC) देखील शुभेच्छा दिल्या आहेत. विराट कोहली इन्स्टाग्रामवर नेहमी अॅक्टिव्ह असतो. तिथं तो अनेक व्हिडीओज, फोटो शेअर करत असतो. 100 मिलिअन क्लबमध्ये आणखी कोण? विराट कोहली हा जगातला एकमेव क्रिकेटर आहे ज्याचे इंस्टावर 100 मिलियन फॉलोअर्स आहेत. विराटसह द रॉक ड्वेन जॉनसन, फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो, नेमार, लियोनेल मेसी या क्लबमध्ये आहे. सोबतच सेलिब्रिटींमध्ये बेयॉन्से आणि एरियाना ग्रॅंड या क्लबमध्ये आहेत. खेळाडूंच्या यादीमध्ये विराट चौथ्या क्रमांकावर आह...

कोरोना लस घेण्यापूर्वी जाणून घ्या ‘या’ 20 आजारांची यादी, 1 मार्चपासून याच आधारावर होणार लसीकरण

चित्र
    60 ते 45 या वयोगटादरम्यान गंभीर आजार असणाऱ्या नागरिकांनासुद्धा कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे Maharashtra Times : येत्या 1 मार्चपासून कोरोना लसीकरणाच्या ( corona vaccination) दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होणार आहे. या टप्प्यात 60 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येणार आहे. लस घेण्यासाठी 1 मार्चपासूनच सुरुवात होणार आहे. आरोग्य मंत्रालयाने या टीकाकरणासाठी 20 गंभीर आजारांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार येत्या 1 मार्चपासून लसीकरण केले जाणार आहे. दरम्यान कोरोना लस ही शासकीय रूग्णालयात मोफत दिली जाणार आहे, तर खासगी रुग्णालयात लोकांना याची किंमत मोजावी लागेल. (Second Phase Corona Vaccination) 60 ते 45 या वयोगटादरम्यान गंभीर आजार असणाऱ्या नागरिकांनासुद्धा कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. 60 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना वय निश्चित करण्यासाठी आपले ओळखपत्र दाखवावे दाखवावे लागेल. तसेच ज्या नागरिकांना गंभीर आजार आहेत, त्यांना डॉक्टरने दिलेले आजारी असल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल. यात हृदयरोग, सीटी / एमआरआय-स्ट्रोक, 10 वर...

कांद्याच्या भावात मोठी घसरण; बळीराजा हवालदिल

चित्र
 राज्यातून लाल आणि उन्हाळी कांद्याची मागणी कमी झाल्यामुळे कांद्याच्या बाजारभावात घसरण पाहायला मिळत आहे. | Onion rates in Maharashtra नाशिक:राज्यासह देशांतर्गत उन्हाळ कांद्याची आवक येण्यास सुरुवात झाल्याने कांद्याच्या (Onion) बाजारभावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत 50 टक्क्यांची घसरण झाली आहे. आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत चार हजार रुपये विक्री होणाऱ्या कांद्याला 2000 ते 2200रुपये इतका सर्वसाधारण दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. (Onion rates in Maharashtra) देशांतर्गत ठिकाणी अवकाळी पावसानंतर उन्हाळी कांद्याची आवक राज्यासह गुजरात, राजस्थान ,मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल तसेच दक्षिण भारतातील कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे या राज्यातून लाल आणि उन्हाळी कांद्याची मागणी कमी झाल्यामुळे कांद्याच्या बाजारभावात घसरण पाहायला मिळत आहे. लासलगाव बाजार समितीत गेल्या आठवड्यात लाल कांद्याची 50 हजार क्विंटल आवक झाली होती त्याला किमान 900 रुपये , कमाल 4390 रुपये तर सर्वसाधारण 3004 रुपये प्रति क्विंटलला बा...

IND vs ENG : भारताला मोठा धक्का, वनडे मालिकेत रोहित शर्मा आणि रिषभ पंत होऊ शकतात संघाबाहेर

चित्र
  भारतीय संघाला वनडे मालिकेत आता मोठा धक्का बसू शकतो, असे म्हटले जात आहे. कारण भारतीय संघातील रोहित शर्मा, रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदरसारख्या खेळाडूंना आता वनडे मालिकेत खेळता येणार नाही, असे म्हटले जात आहे . Ind vs ENG series भारतीय संघाला आता वनडे मालिकेतही मोठा धक्क बसू शकतो, असे दिसत आहे. कारण भारताचे तीन महत्वाचे खेळाडू या वनडे मालिकेत खेळणार नसल्याचे आता समोर येत आहे. कारण या मालिकेत आता रोहित शर्मा आणि रिषभ पंतसारखे महत्वाचे खेळाडू संघाबाहेर होऊ शकतात, असे दिसत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिका पुण्यामध्ये खेळवण्यात येणार आहे. ही मालिका २३ मार्चपासून सुरु होणार आहे. सध्याच्या घडीला पुण्यामध्ये करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नेटवर्क-१८ (हिंदी) या वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार या मालिकेत रोहित, रिषभ आणि वॉशिंग्टन सुंदर यांना खेळवण्यात येणार नसल्याचे म्हटले जात आहे. 💁रोहित, रिषभ आणि सुंदर यांना का देण्यात येणार विश्रांती? Maharashtra Times : रोहित, रिषभ आणि सुंदर हे आयपीएलपासून सातत्याने क्रिकेट खेळत आहेत. ते गेल्या बऱ्याच महिन्यांपासून बायो-बबलमध्ये आ...