भारताला मोठा धक्का, ट्वेन्टी-२० संघातून हा खेळाडू होऊ शकतो बाहेर.
भारतीय संघाला ट्वेन्टी-२० मालिका सुरु होण्यापूर्वीच एक धक्का बसला आहे. कारण भारताच्या संभाव्य संघातील एक खेळाडू आता बाहेर होऊ शकतो, असे पाहायला मिळाले आहे. हा खेळाडू नेमका कोणत्या कारणांमुळे संघाबाहेर होऊ शकतो,
अहमदाबाद, IND vs ENG : कसोटी मालिकेनंतर भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी भारताच्या संघातील एक खेळाडू बाहेर होऊ शकतो आणि त्यामुळे भारतीय संघाला अजून एक धक्का बसू शकतो.
इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ यापूर्वीच जाहीर करण्यात आला आहे. या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या खेळाडूंची फिटनेस चाचणी बीसीसीआय घेत आहे. पण भारताचा एक खेळाडू या फिटनेस चाचणीत नापास झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या खेळाडूला संघातून वगळण्यात येऊ शकते, असे म्हटले जात आहे.
गेल्या आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळणाऱ्या वरुण चक्रवर्तीने कमाल केली होती. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठीही निवडण्यात आले होते. पण त्यावेळी वरुणच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाऊ शकला नव्हता. पण आता इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी पुन्हा एकदा त्याची निवड करण्यात आली होती. पण बीसीसीआयच्या फिटनेस चाचणीमध्ये वरुण नापास ठरला आहे. त्यामुळे आता वरुणला भारताच्या ट्वेन्टी-२० संघातून डच्चू मिळू शकतो, असे म्हटले जात आहे.


टिप्पणियाँ